Wednesday, May 7, 2014

तुझ्यातील माणूसपण....

तुझ्यातील माणूसपण , मी जोखले होते
क्षणही सुखाचे जरा, चाखले होते

चेहऱ्यात एका तुझ्या, चेहरे अनेक होते
लुटलो तरीही माझे, इरादे नेक होते

तुला सोसण्याचे, जडलेले छंद होते
मस्तीतले दुख्ख:ही. भलतेच धुंद होते

असणे माझे तुझ्यापरी. नसल्यासवेच होते
भोवती तुझ्या सारे , गुलछबु थवेच होते

तू आखलेले वर्तुळ, तुझ्यापुरते जग होते
डोळे पुसणारे तुझे, काहीजण ठग होते

चुकते मी केले ते, हिशेब चोख होते
काळाचे उत्तरही, त्यावर चोख होते

नावात तुझ्या आयुष्य, सामावले होते
पूर्वजही तेंव्हा माझे, दुखावले होते। 

माणूस......

माणूस

माणसांच्यागरजेच भांडवल करून

आपलाखिसा भरणारा माणूस

हल्लीतत्वांच्या गोष्टी करतो...

सध्याच्यायुगात एखादा हिंस्त्र प्राणीही

एखादयामाणसाचे जितके लचके काढतनाही

तितकेलचके हल्ली एक माणूस

दुसर्‍या माणसाचे काढतो...

जंगलाच्या राज्यात निदान

वाघ तरी वाघापासून सुरक्षित असतो

पण माणसांच्या जंगलात

माणूसच माणसाला घाबत असतो ...

मैत्रिच्या नावाखाली माणूस हल्ली

स्वार्थासाठी मित्रांणाच लुबाडत असतो...

आज जेंव्हा एखादा माणूस आत्मह्त्या करतो

तेंव्हा कोठेतरी त्याच्या आत्महत्येला

कारणीभूत एक माणूसच असतो...

माणूस स्वतःच स्वतःला अडकवून घेतो

धर्माच्या, नात्याच्या आणि संस्काराच्या बंधनात

आणि मग विनाकारण गुदमरतो...

प्रेम वगैरे या जगात अस्तित्वातच नाही

अस्तित्वात आहे ती गरज या गरजेलाच

आपण कदाचित प्रेम समजतो...

माणूस म्ह्णून जन्माला आल्यावर

फक्त माणूस म्ह्णूनच जगलो असतो

तर कदाचित फक्त माणूस म्ह्णून

आपण अधिक सुखी असतो...

वेडीच आहे ती!

वेडीच आहे ती!
माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,
उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,
वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,
वारंवार मला आठवण करून देतीये,
माहितीये मला ती तस का करतीये!

स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,
डोळ्यांना मात्र कळतंय सार,
नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!

तीच्या शिवाय जगण्याच्या विचाराने,
थरकाप उडालाय माझ्या मनाचा,
भावनांचाही कडेलोट झालाय केव्हाच,
क्षण हा येणार हे दोघांनाही होते माहित,
पण तरीही मन मात्र तयार होईना निघायला!

हातात हात घेउनी, नजरेला नजर भिडवूनी,
घेताना तीचा निरोप,
होणार माझे पानिपत!

पण,
जाताना देईल तीला मी भरवसा,
असलो जरी साता-समुद्रापार तरी राहील तुझ्या मनात,
तुझ्या प्रेमाची सावली, जाणवेल मला तिथेही,
आठवशील तू प्रत्येक श्वासाला,
जाणवेल तुलाही अस्तित्व माझ,
पापणी आपली लावताना!

तिथेच असेल मी तुझ्या मनात खोलवर रुजलेला,
जाणीव…….तू मनाने सोबत असल्याची पुरवून घेईल मी स्वतःला!

वेडे विश्वास ठेव!
तुझ्या शिवायचा हा प्रत्येक क्षणही,
फक्त तुझाच असेल,
असेल तुझ्याच प्रेमात तो बहरलेला!

वाट पहा!
लवकरच परतेन मी,
तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

प्रेम कसं असावं.....

प्रेम कसं असावं
हे नाभाकडून शिकावं
बरसवून मोत्यांच्या धारा
त्याने धरणीला भिजवावं
नटवून हिरव्या शालुने
त्याने तिला सजवावं
उतरून क्षितिजावर कधीतरी
एक गोड चुंबन घ्यावं
प्रेम असं असावं .................

प्रेम कसं करावं
हे नदीकडून शिकावं
आस मिलनाची घेऊन उरी
त्याच्यासाठी दरीखोऱ्यातून धावावं
कितीही वळणं आली तरी
अखेर हृदयी सागराच्याच समवाव
प्रेम असं असावं ...