माणूस
माणसांच्यागरजेच भांडवल करून
आपलाखिसा भरणारा माणूस
हल्लीतत्वांच्या गोष्टी करतो...
सध्याच्यायुगात एखादा हिंस्त्र प्राणीही
एखादयामाणसाचे जितके लचके काढतनाही
तितकेलचके हल्ली एक माणूस
दुसर्या माणसाचे काढतो...
जंगलाच्या राज्यात निदान
वाघ तरी वाघापासून सुरक्षित असतो
पण माणसांच्या जंगलात
माणूसच माणसाला घाबत असतो ...
मैत्रिच्या नावाखाली माणूस हल्ली
स्वार्थासाठी मित्रांणाच लुबाडत असतो...
आज जेंव्हा एखादा माणूस आत्मह्त्या करतो
तेंव्हा कोठेतरी त्याच्या आत्महत्येला
कारणीभूत एक माणूसच असतो...
माणूस स्वतःच स्वतःला अडकवून घेतो
धर्माच्या,
नात्याच्या आणि संस्काराच्या बंधनात
आणि मग विनाकारण गुदमरतो...
प्रेम वगैरे या जगात अस्तित्वातच नाही
अस्तित्वात आहे ती गरज या गरजेलाच
आपण कदाचित प्रेम समजतो...
माणूस म्ह्णून जन्माला आल्यावर
फक्त माणूस म्ह्णूनच जगलो असतो
तर कदाचित फक्त माणूस म्ह्णून
आपण अधिक सुखी असतो...
No comments:
Post a Comment